ऋतू ग्रीष्माचा ,सूर्य भडकला
,पर्णहिनशा वृक्षीं,
शीर्ण जाहल्या पंखांसंगे कुणी
टेकला पक्षी .
कुणी पांथस्ते,पुसिले त्याला
,कोण,कुठून तू
आला ?
कुतूहल पाहुनी त्याचे
,खग तो ऐसे त्यासी वदला....
" म्हणशील
वेडा पक्षी का
ह्या ग्रीष्मामाजी पळतो
?
शीतल राने, वा
उद्याने सोडूनि येथे
जळतो?
याच तरुवर बांधून
घरटे मम् माता
पितरांनी,
चोच चोचीने घास
आणुनी ,वाढविले या
रानी.
मातृवृक्ष हा माझा
म्हणुनी,नेमे येथे
येतो .
बालपणीच्या आठवणींतून उगाच थोडे
रमतो .
भविष्य या वृक्षाचे
मित्रा, मजला नाही ठावे
!
वठेल किंवा फुटेल
पल्लव ,तुटेल अथवा
घावे.
वेडा अथवा पिसा
म्हणो कुणी,फरक
न मजला तेणे,
जोवरी पंखी उडण्याचे
बळ,तोवर येथे
येणे .“
परदेशी पांथस्था ऐसे ,बोलुनी
उडुनी गेला,
शैशव स्मरुनी ,वाटसरूही ,मग
थोडा घुटमळला .
No comments:
Post a Comment