Thursday, March 12, 2020

काळ

भिंतीवर टांगून घड्याळे,
कुणी म्हणाले 'काळ जिंकला!'

काय म्हणावे त्यांना,त्यांचा,
दर्पपरीने कान फुंकला.

परिमाणे शत होती,पुन्हा, होतीलही तो काळ मोजण्या,

हाती लागणे,शक्य नसे तो,अर्थ नसे या व्यर्थ बोलण्या.

तोच होउनि महाकाल मग,दाविल अंती रुप आगळे,

स्थिर काळ अन् आम्हीच भ्रमतो,कळेल जेव्हा,मिटती डोळे!

                    .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...