भिंतीवर टांगून घड्याळे,
कुणी म्हणाले 'काळ जिंकला!'
काय म्हणावे त्यांना,त्यांचा,
दर्पपरीने कान फुंकला.
परिमाणे शत होती,पुन्हा, होतीलही तो काळ मोजण्या,
हाती लागणे,शक्य नसे तो,अर्थ नसे या व्यर्थ बोलण्या.
तोच होउनि महाकाल मग,दाविल अंती रुप आगळे,
स्थिर काळ अन् आम्हीच भ्रमतो,कळेल जेव्हा,मिटती डोळे!
.🍃संतोष
कुणी म्हणाले 'काळ जिंकला!'
काय म्हणावे त्यांना,त्यांचा,
दर्पपरीने कान फुंकला.
परिमाणे शत होती,पुन्हा, होतीलही तो काळ मोजण्या,
हाती लागणे,शक्य नसे तो,अर्थ नसे या व्यर्थ बोलण्या.
तोच होउनि महाकाल मग,दाविल अंती रुप आगळे,
स्थिर काळ अन् आम्हीच भ्रमतो,कळेल जेव्हा,मिटती डोळे!
.🍃संतोष
No comments:
Post a Comment