तिच्याचसाठी कितीक तयाने
,लिहिल्या असतील प्रेम
कविता,
चंद्र चांदणे,हिरवळ,पाऊस,असतील
थकले गाता गाता.
परी अनामिक होती
हुरहूर, ऊन पावसाच्या खेळांची.
सहवासातून सलज्ज सुमने
,होता नेत्रीं मौंन
कळ्यांची .
------------------------
आता तनांच्या आवेगातच ,चंद्र
मनांचे क्षितिजी बुडती,
तरल क्षणांची लाज पाखरे
,मिटुनी डोळे,भिऊन
उडती.
बेफिकीरांच्या
उठवळ गाथा,तनामनांच्या
या निरगाठी!.
सुटणे अवघड,नशिबी
तुटणे!फुटकी नाती
घेऊन पाठी.
No comments:
Post a Comment