घरंदाज काही मनीचे उखाणे
पडे प्रश्न त्या उत्तराला पुन्हा,
नसे गूढता,स्पष्ट डोळ्यात प्रतिमा,
तरी आत्मविश्वास होई उणा,
तयां माझिया दुष्टचक्रास भेदून,
भूमीतुनी रोप येते नवे.
आणि शब्दकोंबातुनि ये पिसारा,
जसे सांजवेळी उजळते दिवे.
तरारुन येते कधी कल्पनेचे
तरु त्यास शाखा नव्याने फुटाव्या,
मुक्या,बोलक्या काव्यसंकेतकलिका,
फुलोनी हळु देठदेही उठाव्या
सलांच्या व्रणांची जुनी बोच शमुनि,
खुळ्या वेदना अंतरीच्या मिटाव्या.
तळ्याच्या तळी पोहणाऱ्या मनाच्या
खुणा जाणिवेच्या नभाला पटाव्या.
.🍃संतोष