आषाढातील अश्रू सखे गं,
जळांत मिसळून गेले.
कुणा न कळले दुःख अनावर,
क्षणभर तरळून गेले.
नाही फुटला टाहो,
नाही मना वेदना झाल्या,
खोल आतले वर येताना
मधेच अन् घुसमटले.
वरवरच्या ज्या तरंगलहरी,
झुळुक,कोवळी माया,
आत भोंवरे गिरक्या घेती,
टपले सावज खाया.
गेले ते ते गेले,नाही,
परतून आले कोणी,
इतिहासातील पिवळी पाने!
रद्दी भरल्या गोणी!
खचले,परतून नव्या रुपाने
नटले जरी हे घर,
स्म्रुतीत भिजल्या पूर्व क्षणांचा
जाणवतो वावर!
सुखदुःखाचा लोहताजवा,
परिसाने तोलावा,
असा योग तू दे रे देवा,
सुवर्णक्षण पेलावा!
.🍃संतोष
No comments:
Post a Comment