Thursday, August 19, 2021

मुकाम


शुद्ध सत्य का,इस दुनिया मे 

बहुत कठिन है मिलना!

बिना मिलावट सोने का भी 

बना न सकते गहना!


वास्तव है ये,झूठ नहीं,

आकार हमे है भाता,

रागस्वरोंको समझाने मे,

शब्द काम मे आता.


निर्गुण उर्जा चलन वलन मे 

परिवर्तित हो जाती,

उसी समय सबको दिखती है 

वरना छुप सी जाती.


रुपक की जब चादर ओढे,

तत्त्व सामने आता,

वही पुराणोंकी काव्योंमे 

कवी चांव से गाता.


राम झूठ है? क्रुष्ण झूँठ है? 

झूँठ है फिर सब दुनिया!

निराकार को बिना जानके,

बेंचे वो तो बनिया!


सभी सिद्धताओंसे परे है,

उनका अब क्या कहना?

मूढमती,जो प्रमाण माँगे, 

भूल चूका है बहना.


अंतर्हेतू क्या है इस पर 

सब कुछ निर्भर भाई!

शुद्ध वस्तू का अंश सगुण मे

बात यही दोहराईं.


मूर्त भाव आकार लिये

जब करवाये कुछ लीला!

प्रेमकी गंगा उठे उमडकर 

भावभक्ती का मेला!


यही सगुण है ,प्रथम परिक्षा

तत्व बाद मे आता!

तत् त्वम् आदि,महावाक्य तब 

गुरुमुख से कहलाता!


तब तक थोडी करे तितिक्षा

श्रद्धा ना झूँठलाना.

मार्ग भिन्न है,लेकिन हम को

एक मुकाम है पाना।


                                   .🍃संतोष

सवाल


आरजू है क्या तेरी अब 

बस मुझे तू बोल दे!

मेरे मन तू ख्वाईंशोंके

द्वार सब बस खोल दे!


चांद दूँ या चांदनी?

झील या मंदाकिनी?

फूल के बागान दूँ या

आसमाँ से दामिनी?


चाहिये जेवर चमकते?

या वो मोती जो दमकते?

इत्र के बादल बरसते?

पंछी मधुस्वर मे चहकते?


नीलिमा नीले नयन की

रक्तिमा पहले किरनकी

पूर्णिमा खिलती, शरदकी

स्वर्णिमा नवअरुणरथ की


क्या दूँ बोलो,मन,टटोलो

मौन का ताला तो खोलो!


त्रुप्ती आये जिस विषय से

फिर न माँगे और दूजाँ,

दो मुझे तुम गर है देना,

फिर करुँ मै उसकी पूजा!


सुजन सुनियें और कहियें

क्या है वह?और कहाँ मिलेगा?

ऋण है मनका मन को देना

क्या पता कब दिन ढलेगा!


                                 .🍃संतोष

त्या कुसुंबी कोवळ्या..

त्या कुसुंबी कोवळ्या,

कुसुमांस केव्हां नीज आली?

डोलत्या डाळिंबरंगी 

कोषिकांची शेज झाली.


वाहत्या वाऱ्यात पारा,

पाचूच्या रानी पळाला,

शांत शितल जलतरंगी,

डुंबुनी वलयी मिळाला.


मखमली मार्गात हिरव्या, 

पायवाटा गुप्त झाल्या,

गोड गंधांच्या नशेने,

गुंगुनि का सुप्त झाल्या?


किरमिजी जांभूळनिळा कां,

नभतळ्याचा काठ झाला?

अन् अचानक अभ्रभरल्या

अम्रुताचा माठ झाला!


न्हाण आले नवरसांना,

उमलुनी उन्मेष आला.

मग म्हणाले झाड ओले,

'मज मुलां,संतोष झाला.'


                              .🍃संतोष

Monday, August 2, 2021

मी

कालचा मी काल गेला,

आजचा येथेच मी!


का उद्याच्या हाती मी 

जो,होउ त्यासाठी श्रमी?


चाललेला ताल नाही

द्रुत करोनी फायदा.


मोकळ्या जागा भराया

अन् नको तो कायदा.


षड्ज पंचम स्वरपटावर

चित्र निर्गुण उमटते,


उमटते,मिटते तयातच

अंती काही प्रगटते.


हाती उरले जे स्म्रुतींच्या,

शुभ्र काही कवडसे.


मार्गदर्शन तेच करतील,

अनुभवांचे आरसे.


शब्द घोटीव,अर्थ सुकला

नाही ऐसा मामला,


रस गळूदे,शुद्ध आता

काळ आहे थांबला!


                                    .🍃संतोष

मैत्री

 करडा कबरु ,गोरा गबरु

दोघे जानी दोस्त खरोखर.


गळ्यात घालून गळे हिंडती,

जना भासती जणू सहोदर.


कबरूला गबरूचा हेवा

कधीच नव्हता स्वप्नीसुद्धा!


गबरुच्याही मनात शिरला 

नाही भलतासलता मुद्दा!


मत्सर काविळ झालेल्यांनी,

चहुबाजुंनी बोंब उठविली,


अन् दोघांच्या मैत्रीमध्ये 

कायमची ही ठिणगी पडली.


                                  .🍃संतोष

नभ आणि मेघ(रुपक)

मेघ सावळा सावळा,

नभा लावतसे लळा,

रंग टाकुनिया निळा,

नभां चढे क्रुष्णकळा!


कसे पुंजावले मेघ

तोय आकंठ पिऊन,

बोट लागता वार्याचे

आले खालती झरून.


मेघ दूतरुपे आला 

त्याचा ओलेता निरोप,

गंध पळे रानोमाळ,

गेली वार्ता आपोआप.


जणू अमुर्तसे चित्र,

नभी मेघकुंचल्याचे.

काही आक्रुत्या,आभास,

मू्र्त सजीव झाल्याचे.


छाया क्रुष्णपदराची

आत झरे मेघस्तन्य

पाजी नभ धरतीला

ऐसे वात्सल्य अनन्य.


नाही फिटणारे ऋण,

अनुबंध पुरातन.

द्वैत नभजलदांचे,

धाले एकत्वे न्हाऊन.


                                 .🍃संतोष

बारिश बोले बूंद की बोली

 बारिश बोले बुंद की बोली, 

धूप से खेले आंखमिचौली.


शोर मचाती,संग घुमड घन 

शीतल झरवन,कुछ मनभावन.


पतियनको देती हैं ताली

मोतियनसे दमकत है डाली. 


छमकत छुम छुम,

झील की जल पर,


फिसलत,गिरकर,

डगर डगर पर.


ठहरत मुडकर, 

नहर नहर पर.


थिरकत धिं धिं,

जलकी प्रतल पर.


बारिश बोले बूंद की बोली

फिर यादोंने पलके खोली।


कुछ सुलझीसी,कुछ पहचानी,

कुछ उलझीसी,कुछ अंजानी!


बारिश बोले बूंद की बोली...


बारिश बोले बूंद की बोली...


                                    .🍃संतोष

Sunday, August 1, 2021

बारिश, फिरसे!


फिरसे बारिश,सावन फिरसे !

फिरसे घटासे,मोती बरसे!


वही पुरानी,और पहचानी, 

इत्र हवा मे घुली किधरसे!


नया है क्या फिर?

सब तो वही है!

कहे जो कोई,यूँ तो सही है!..


शिशिरगलित सब पर्ण पुष्प ज्यों,

नवोत्साह से पुनः मुकुलित हो,


सुप्तभाव मे निद्रा लेते, 

तृण के बीज पुनःआकुलित हो!


राग,ताल भी वही पुरातन,

उपज मिले तो नवसर्जित हो,


कणस्वर नूतन,नयी गुँजाईश

विसंवाद सब परिवर्जित हो!..


जैसे सारी बेलरिया भी 

नये ऋतू मे फिर ऋतुमती हो,


जैसे भव की जननामृती मे

उसी चिरंतन की नित स्मृती हो!


ऋतूचक्रोंकी पुनरावृती मे

किसी काव्यकी यूँ अनुभुती हो...



ऐसे अनुभव देती बारिश,

गौर से देखे,सबको गुजारिश!


गिरता पानी सिर्फ नही है,

नया नजरियाँ,नयी है बारिश!


                                   .🍃संतोष

निरांजनी कळ्यांनो...

 बाबा आमटे यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांचं आत्मचरित्र, समिधा नुकतंच वाचनात आलं.

अफाट अनुभवांनी भारलेलं जीवन.


एका ओळीत मांडायचा प्रयत्न केला तर,

बाबांचे व्यक्तिमत्त्व आकाशाला स्पर्श करणार्या विशाल व्रुक्षासारखं मानलं तर साधनाताई या त्या व्रुक्षाच्या न दिसणार्या जमिनीत स्वतःला गाडून घेतलेल्या मुळ्या होत.

त्या स्वतः अत्यंत आस्तिक होत्या,मात्र विचारांनी सुधारक होत्या.

आनंदवनातील सद्यपरिस्थिती यावर आपण मत व्यक्त करणं औद्धत्याचं होईल परंतु कुटुंबाला एकत्र ठेवणारा साधनाताईंचा आईपणाचा धागा तुटल्यामुळे तर असं झालं नसेल असं वाटून गेलंच!

खालील काव्यरचना  करताना पुस्तकाचा, साधनाताई यांच्या कार्याचा स्वर आत मनात कुठेतरी निनादत होता.

आणि मला समिधा यापेक्षा निरांजनच आठवलं त्यांना पाहून, समिधा जळून जाते, निरांजन शांत तेवत राहते, गाजावाजा न करता...

ईतकी प्रस्तावना त्यासाठी...

( स्वप्नातल्या कळ्यांनो आणि समईच्या शुभ्र कळ्या यातील रुपक घेतले आहे, आशय मात्र वेगळा आहे)

–--------------------///--------------///-------------------------


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा!

होईल गर्द गहिरा काळोख दाट जेव्हां!


माझ्याकडे फुलांचा कैवल्यघोस आहे

किरणांतल्या झुल्यांचा त्यांनाच सोस आहे.


मुक्तांबरी निळ्याचा हा पांघरून शेला,

जो आर्त गीत गातो,त्याचीच ओढ जीवा,


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा!   (१)


सौंदर्य सोनपंखी सुखवर्ख माखलेले,

तरीही तयास वेढे, सारेच आखलेले!


कुरवाळुनी स्वतःला जे गुंतले जरासे

पल्ला सुदूर गेला,उलटून सर्व फासे.


शास्त्रार्थ घोकणारे पांडित्य शुष्क होता,

उधळा रसाळतेचा सद्भक्तीयुक्त ठेवा!


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा! (२)


बोलायवास काही गेलो खरे जगाला,

होताच पाठमोरा गलका अमाप झाला.


पटले न काही तरीही,केले उगाच जेव्हां,

त्या छद्मवर्तनाचा मजलाच भार झाला.


आता उगेपणाला वैराग्य नाव द्यावे?

अथवा निलाजरे हे डोळे उधार घ्यावे?


काहीच बोध नाही,तरीही करू वहाव्वा?


निरांजनी कळ्यांनो फुलणे सुरूच ठेवा!(३)


गिरवावयास काही ती अक्षरे मिळाली,

त्यांच्याच साधनेने,काही ऋते कळाली.


झिजणे जरी चुकेना,तत्वार्थ प्राण ओतू.

वाटा अनंत फिरतो,घरटे उरी परंतु!


मजला उगाळुनी मी मजलाच लेप द्यावा,

आयुष्य चंदनाचे, मरणां सुगंध यावा.


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा! (४)


उष्टावले कितीदा,विषयांत नाही गोडी,

चोथाच सर्व उरला,थकली चरुन घोडी.


हलकेच वात वाही,ती दूरची लकेर!

होईल या तमाची जाणा आता अखेर!


काळीज कापराचे वितळुनिया सुगंधी

आर्तातले अभंग भिनतात सर्व रंध्री.


आता पहाटपावा प्राणांतरी घुमावा,

ओला सुवर्णचाफा श्वासात मोहरावा.


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा! 

होईल गर्द गहिरा काळोख दाट जेव्हां. (५)


                                  .🍃संतोष

आषाढ अश्रू


आषाढातील अश्रू सखे गं, 

जळांत मिसळून गेले.


कुणा न कळले दुःख अनावर,

क्षणभर तरळून गेले.


नाही फुटला टाहो,

नाही मना वेदना झाल्या,


खोल आतले वर येताना

मधेच अन् घुसमटले.


वरवरच्या ज्या तरंगलहरी,

झुळुक,कोवळी माया,


आत भोंवरे गिरक्या घेती,

टपले सावज खाया.


गेले ते ते गेले,नाही, 

परतून आले कोणी,


इतिहासातील पिवळी पाने!

रद्दी भरल्या गोणी!


खचले,परतून नव्या रुपाने

नटले जरी हे घर,


स्म्रुतीत भिजल्या पूर्व क्षणांचा

जाणवतो वावर!


सुखदुःखाचा लोहताजवा,

परिसाने तोलावा,


असा योग तू दे रे देवा,

सुवर्णक्षण पेलावा!


                                .🍃संतोष

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...